राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी असं अचानक राजीनामा देण्याची घोषणा केल्याने पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे. अध्यक्षपदावरून पक्षात फूट पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.

आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आलं तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू… अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने आमच्याशी तसा संपर्क साधला नाही, असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अस्थिरता आणि संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “शरद पवारांनी नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. त्यांनी अनेकांचं नेतृत्व घडवलं. त्यांचे लोकांशी भावनात्मक संबंध आहेत. त्यामुळे लोकांना वाईट वाटतं. पण राष्ट्रवादीतील कुणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. आमच्याकडे कुणीही आलं नाही. कुणाच्याही पक्षप्रवेशाची काहीही चर्चा झाली नाही. आणि आमच्यातील कुणीही राष्ट्रवादीतील नेत्यांशी संपर्क साधला नाही.

हेही वाचा- “राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

“शरद पवारांनी जे काही काम केलं आहे, त्यांच्या कामाचे भावनात्मक संबंध लोकांशी जोडले आहेत. त्यामुळे शरद पवारांनीच पक्ष चालवला पाहिजे, असं त्यांना वाटतं. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे. शेवटी आमच्याकडे कुणीही पक्षप्रवेशासाठी आलं तर आमचे दरवाजे उघडेच आहेत. आम्ही कुणालाही नाही म्हणत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आमच्या पक्षात कुणीही यायला तयार असेल तर आम्ही कधीही कुणाचा पक्षप्रवेश थांबवत नाही,” असंही बावनकुळे पुढे म्हणाले.

हेही वाचा- “मुंबईतील बैठकीबद्दल कुणीही कल्पना दिली नाही”, जयंत पाटलांचं विधान

“आम्हाला कुणाच्या अस्थिरतेचा फायदा घ्यायचा नाही. आम्हाला त्यांच्याकडे बघायचंही नाहीये. त्ंयाचे निर्णय त्यांनी घ्यायचे आहेत. पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कुणी पक्षप्रवेशासाठी आला तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करणारच… त्यांचा पक्षप्रवेश करणारच कारण त्यांना आमची विचारधारा मान्य आहे. ते आमच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. देशाचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून ते भाजपात येत असतील. आमचा विकासाचा अजेंडा मान्य करत असतील. मोदींच्या विकासाच्या संकल्पनेनाला साथ देणारा कुणीही असेल तर आम्ही त्याला पक्षात घेणार आहे,” असंही बावनकुळेंनी नमूद केलं.

Story img Loader