भारतीय जनता पार्टी आपल्या मित्रपक्षांना वापरते आणि योग्य वेळी त्यांना संपवून टाकते, असा आरोप भाजपाच्या अनेक मित्रपक्षांनी यापूर्वी केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनीदेखील असा आरोप यापूर्वी केला आहे. अशातच भाजपाच्या आणखी दोन मित्रपक्षांनी भाजपावर आरोप केला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले, भाजपा लहान पक्षांचा वापर करते, त्यानंतर त्यांना फेकून देते. त्यांच्याकडे मोठी माणसं आली की त्यांना छोट्या माणसांची काही गरज नसते. भाजपा आणि काँग्रेसची अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची हीच पद्धत आहे. जानकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू म्हणाले, जानकर जे काही बोलत आहेत तसा अनुभव मलाही येऊ लागला आहे. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं असं राजकारण आहे. हे चालतंय तोवर असंच चालत राहणार आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा