राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यापासून राज्यभरातले ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. राज्य सरकारविरोधात भूमिका असतील तर भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतल्याने महायुतीतले काही नेते भुजबळांविरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांवर शेलक्या शब्दांत टीका केली. संजय गायकवाड म्हणाले, “भुजबळांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढलं पाहिजे.” या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा