शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की, मी मराठा समाजाला आरक्षण देईन. त्यानंतर अनेक महिने मराठा समाजाचं आंदोलन चाललं. अखेर २७ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या वेशीवर (वाशी, नवी मुंबई) दाखल झालेल्या मराठा मोर्चाला सामोरे गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करून त्यासंबंधीची अधिसूचना मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करत कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील लोकांचा ओबीसीत समावेश केला जाईल हे स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यातल्या ओबीसी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा