मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारने अनेकवेळा आश्वासन देऊनही आरक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करावा, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. ही मागणी घेऊन जरांगे पाटील मराठा समुदायाचा मोर्चा घेऊन २० जानेवारी रोजी मुंबईत धडक देणार आहेत. दुसऱ्या बाजूला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील शाब्दिक युद्ध चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संध सोडत नाहीत.

एकीकडे छगन भुजबळ हे ओबीसी समाजाला मराठा समाजाविरोधात भडकावत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. तर दुसऱ्या बाजूला, मराठा आंदोलनादरम्यान, राज्यात बीडसह इतर काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारास मनोज जरांगे पाटील जबाबदार असल्याचा आरोप भुजबळ सातत्याने करत आहेत. अशातच छगन भुजबळ यांनी शनिवारी (१३ जानेवारी) बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

delhi assembly election 2025
लालकिल्ला : भाजपसाठी वर्ग ठरला ‘धर्म’!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
the high court upheld states decision rejecting bjp mp gopal shettys petition
बहुमजली झोपड्यांना झोपु योजनेचे लाभ न देण्याचे सरकारचे धोरण योग्यच उच्च न्यायालयाचा निर्वाळा, धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टींची याचिका फेटाळली
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
baba amte loksatta news
वंचितांच्या सेवेची पंचाहत्तरी…
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

छगन भुजबळ म्हणाले, ते उपोषणकर्ते (मनोज जरांगे पाटील) सांगतात की, तीन कोटी मराठा समुदायाला घेऊन ते मुंबईत जाणार आहेत. हे सगळे लोक कामधंदा सोडणार आणि तुमच्यामागे मुंबईत जाणार…तुम्ही फिर फिर फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार. तुम्ही नुसती चक्कर मारणार… काय तर म्हणजे जवान नेता…पण दोन-चार बैठका घेतल्या की हॉस्पिटलमध्ये झोपणार.

हे ही वाचा >> “…तर हे लोक झेंडे लावायला मंदिरावर चढू शकले नसते”, ‘त्या’ घटनेची आठवण करून देत उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे असलेल्या नेत्यांना उद्देशून छगन भुजबळ म्हणाले, जे शांत आहेत त्यांच्याविरोधात आम्ही काही बोलणार नाही. परंतु, जे आमच्याविरोधात त्यांना (मनोज जरांगे यांना) शक्ती देत आहेत, त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. जे काही चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल.

Story img Loader