CM Devendra Fadnavis on chargesheet filed in santosh Deshmukh murder Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र चर्चा होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये खंडणीत आडवे आल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून या प्रकरणातील आरोपींनी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. या दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे,
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा