टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर आता भारतीय संघावर बक्षीसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात ७ धावांनी भारताने शानदार विजय मिळवला. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले आहे. त्या पार्श्वभीमीवर मुंबईत ४ जुलै रोजी भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं.

भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्हवर काल उपस्थित होते. काल विजय परेड पार पडल्यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघासाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाला तबब्ल ११ कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट करतही दिली आहे.

Devendra Fadnavis On Mumbai Victiory Parade
“आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Team India
जगज्जेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस, ICC पाठोपाठ BCCI कडून ‘इतक्या’ कोटींचं बक्षीस

हेही वाचा : “आपली विकेट तर जाणार नाही ना?”, काल मुंबईत झालेल्या गर्दीवर बोलताना फडणवीसांचं मोठं विधान

महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियासाठी ११ कोटी रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. तसेच मुंबई महानगर क्षेत्रात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, “भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केलं आहे. पराभवाच्या छायेतून विजय खेचून आणून कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी, अशी कामगिरी केली आहे”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान, विश्वविजेत्या टीम इंडियासाठी आज विधानभवनात सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आदी महत्वाचे नेते उपस्थित होते.