शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक सूचक विधान केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्यात प्रचंड क्षमता आहे. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं, असं विधान शिरसाट यांनी केलं होतं. शिरसाट यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लढवले जात होते. शिंदे गट आणि भाजपात धुसपूस सुरू झाल्याचंही बोललं जात होतं. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाटांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. केंद्रात नेतृत्व करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा असेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Eknath khadse joins bjp marathi news
खडसेंचा पक्षप्रवेश केंद्रीय नेतृत्वाशी चर्चेनंतर- फडणवीस
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Rajendra Raut protest started in Barshi on reservation issue solhapur
सोलापूर: आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत ठिय्या आंदोलन सुरू
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…

हेही वाचा- “शरद पवारांनी हुकूमशहा प्रवृत्तीने…”, अजित पवार गटाच्या आरोपांवर जयंत पाटलांचं उत्तर, म्हणाले…

शिरसाटांच्या वक्तव्यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्याबरोबर असणं आवश्यक आहेत. एक टीम म्हणून आम्ही तिघेही बरोबर असणं गरजेचं आहे. तसेच पुढे विधानसभा निवडणूक आहे. ती निवडणूकदेखील आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत. ही निवडणूक जिंकणं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. दिल्लीत खूप मोठे-मोठे नेते आहेत. शेवटी केंद्रात नेतृत्व करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक निर्णय असणार आहे. हा निर्णय राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे.”

हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाबाबत काही लोक बॅनर लावतात. परंतु, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. फडणवीसांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असे बॅनर लावण्यात काही गैर नाही. परंतु, माझी इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत, त्यांची इतकी क्षमता आहे की त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं.