लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना मोठा फटका बसल्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला मुख्यंमत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या पराभवाचे विश्लेषण करत असताना मतदार सुट्टीवर गेल्याचे कारण दिले. “आपण ४०० हून अधिक जागा जिंकणार असल्यामुळे आपले हक्काचे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले”, असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले, “आपले मतदार मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेले. पंतप्रधान मोदी ४०० पार जागा आणणारच आहेत, असा विचार करून मतदार सुट्टीवर गेले. आपण गाफील राहिलो आणि विरोधकांचे ८० टक्के मतदार ठपाठप मतदान करून गेले. यातून शिकण्यासारखे आहे. आपल्या ८० टक्के नाही तर ६० टक्के मतदारांनीही जर मतदान केले असते तर आपल्या ४० जागा निवडून आल्या असत्या.”

Kulgaon Badlapur Municipal Council street vendors list announced
बदलापुरातील पथविक्रेत्यांची यादी अखेर जाहीर, पथविक्रेता समितीच्या निवडीनंतर फेरिवाला क्षेत्रही घोषीत होणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ST seeks UPI solution to holiday money dispute Mumbai news
सुट्या पैशांच्या वादावर एसटीकडून ‘यूपीआय’चा तोडगा; प्रतिसादामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Maharashtra Corporation Election
स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली!
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोचले कार्यकर्त्यांचे कान, “आता आपल्याला ताकही फुंकून प्यायचं आहे”

विरोधकांच्या प्रचारावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, त्यांनी खोटा प्रचार केला होता. पण लोक एकदाच फसतात, वारंवार फसत नाहीत. आता आम्ही शहाणे झालो आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला दुजोरा दिला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी महायुतीचे नेते कमी पडले, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अधिक मतदान मिळाले आहे. पण तरीही विरोधकांच्या ३० जागा जिंकून आल्या. विरोधकांनी माध्यमांसमोर रोज खोटे बोलण्याचा धडाका लावला होता. आपल्याला वाटले की, मतदारांवर याचा काही परिणाम होणार नाही. पण वास्तवात त्याचा प्रभाव मतदारांवर झाला. त्याचा फटकाही आपल्याला बसला. आपण विरोधकांच्या प्रचाराचा प्रभावीपणे सामना करू शकलो नाहीत.

“कोणाला बोलायची खुमखुमी…”, फडणवीसांनी शिंदे-पवारांसमोरच महायुतीच्या प्रवक्त्यांना खडसावलं; नेमका रोख कोणाकडे?

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महायुतीमधील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना केवळ १७ जागांवर विजय मिळविता आला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. एका अपक्षानेही काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची संख्या ३१ एवढी झाली.

Story img Loader