मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध भागांत जाऊन ते सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील ठाणे-पालघर दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगे सभा घेत असल्याने याचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. यावर आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांच्या ठाण्यातील सभेबाबत विचारलं असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मनोज जरांगे सध्या सगळीकडे सभा घेत आहेत. त्यामध्ये कसलीही अडचण नाही. ते सगळ्या मराठा बांधवांना भेटतायत. ठाण्यामधील सभा म्हणजे माझ्या विरोधातील सभा नाही. ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना भेटतायत. सर्वांशी संवाद साधतायत.”

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

हेही वाचा- “मनोज जरांगेंना मारण्याची…”, ठाकरे गटाच्या नेत्याची भुजबळांवर टीका

“मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासनाची भूमिका अतिशय ठाम आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. यासाठी सरकार कटिबद्ध आहे. इतर कुठल्याही समाजाचं किंवा ओबीसीचं आरक्षण कमी न करता, कुणावरही अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे. त्यावर युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मराठवाड्यात जुन्या कुणबी नोंदी सापडत आहेत. न्यायमूर्ती शिंदे यांची समिती यावर काम करत आहे. कायमस्वरुपी टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकार देणार आहे. त्यावर आमचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे,” असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Story img Loader