शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणत टीका केली होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी करणाऱ्यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणणं हा जनतेचा अपमान आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून चालू असलेला बोगसपणा बंद पडला आहे. कारण, कुणी दारातही उभे करण्यास तयार नाही. फाय भयानक परिस्थिती आहे. कुणी त्यांना विचारत नाही. पिकविम्याचे पैसे मिळत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

ashish shelar replied to mamata banerjee
Ashish Shelar : “तुमचा मुलगा खूप…”, ममता बॅनर्जींकडून अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न; आशिष शेलारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
ubt chief uddhav thackeray slam maharashtra government over badlapur incident
विरोधकांचे आंदोलन; भाजपचा जागर; आरोपीला पाठीशी घालण्याचे काम – ठाकरे
Aditya Thackeray
मविआ सत्तेत आल्यावर लुटारु मंत्री, अधिकाऱ्यांना कारागृहात टाकणार; आदित्य ठाकरे यांचा इशारा
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Eknath Shinde, Badlapur, Ladki Bahin Yojana,
लाडकं सरकार लक्षात ठेवा! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

“घोषणा करून भुलभुलैया करू नका”

“सरकारचा उल्लेख दुष्काळात तेरावा महिना असा याआधीही केला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज वाढत आहे. बँकांचे तगादे शेतकऱ्यांमागे लागले आहेत. विमा कंपन्यांची दारे ठोठावली तरी उघडत नाहीत. ही थोतांड नाटके बंद करून शेतकरी कर्जमाफी करावी. निवडणुका तोंडावर आहेत घोषणा करून भुलभुलैया करू नका,” असंही ठाकरेंनी सरकारला ठणकावलं होतं.

“‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे जनतेचा अपमान”

याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं, “काहीजण म्हणतात, ‘शासन आपल्या दारी’ बोगस कार्यक्रम आहे. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’चं महत्वं काय कळणार? शेतकरी, कष्टकरी आणि माता-भगिनींच्या वेदना काय कळणार? ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या जनतेचा अपमान आहे. आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही.”