शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणत टीका केली होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी करणाऱ्यांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला ‘बोगस’ म्हणणं हा जनतेचा अपमान आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे. ‘शासन आपल्या दारी’ म्हणून चालू असलेला बोगसपणा बंद पडला आहे. कारण, कुणी दारातही उभे करण्यास तयार नाही. फाय भयानक परिस्थिती आहे. कुणी त्यांना विचारत नाही. पिकविम्याचे पैसे मिळत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Narendra Modi target arvind Kejriwal in lok sabha speech
निधीचा वापर देशासाठीच! पंतप्रधानांचे लोकसभेत प्रत्युत्तर; केजरीवाल यांच्यावर टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

“घोषणा करून भुलभुलैया करू नका”

“सरकारचा उल्लेख दुष्काळात तेरावा महिना असा याआधीही केला आहे. शेतकऱ्यांचं कर्ज वाढत आहे. बँकांचे तगादे शेतकऱ्यांमागे लागले आहेत. विमा कंपन्यांची दारे ठोठावली तरी उघडत नाहीत. ही थोतांड नाटके बंद करून शेतकरी कर्जमाफी करावी. निवडणुका तोंडावर आहेत घोषणा करून भुलभुलैया करू नका,” असंही ठाकरेंनी सरकारला ठणकावलं होतं.

“‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे जनतेचा अपमान”

याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं, “काहीजण म्हणतात, ‘शासन आपल्या दारी’ बोगस कार्यक्रम आहे. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांना ‘शासन आपल्या दारी’चं महत्वं काय कळणार? शेतकरी, कष्टकरी आणि माता-भगिनींच्या वेदना काय कळणार? ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ला बोगस म्हणणं म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या जनतेचा अपमान आहे. आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही.”

Story img Loader