निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही गटाला हे शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सकाळी ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

bjp vs congress in haryana election
विश्लेषण : हरियाणात किसान, जवान, पहिलवान नाराज? मतदारांचा कौल कुणाला? भाजप सावध, काँग्रेस आशावादी…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
Controversy over ministership in Shiv Sena
शिवसेनेतील मंत्रिपदाची रस्सीखेच चव्हाट्यावर
atishi takes charge as delhi cm with empty chair
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार; कारण सांगत म्हणाल्या…
Efforts by BJP and Shiv Sena Shinde group to make Ajit Pawar group leave the Grand Alliance and contest the assembly elections independently
अजित पवारांच्या एक्झिटसाठी चक्रव्यूह? भाजप-शिंदे गटाकडून आक्रमक रणनीती
Congress complains to Governor about law and order neglecting farmers print politics news
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, कायदासुव्यवस्था ढासळली; काँग्रेसची राज्यपालांकडे तक्रार
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“माझ्या मते उद्धव ठाकरे समर्थ आहेत. त्याचबरोबर जो प्रकार सुरू आहे, ते जनता बघते आहे. राज्यात सुरू असलेले घाणेरडे राजकारण बघून जनता आपलं मत बनवत असते. त्यामुळे मी जास्त काही या विषयावर बोलणार नाही” , अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शिवसेना पक्षनावासह चिन्हही गोठवले; केंद्रीय निवडणूक आयोगाचा हंगामी निर्णय, उद्धव ठाकरे गटाला धक्का

“आरएसएसने ते सिद्ध करावे”

यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरून सुरू असेलल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “ही विचारांची लढाई आहे. या लढाईत वाद विवाद होतात. जर राहुल गांधींनी काही विचार मांडले असतील. तर त्याला त्यांनी उत्तर द्यावं, त्यांनी हे सिद्ध करावे, की आरएसएस ही संघटना स्वातंत्र लढ्यात सहभागी होती. त्यावरून माफी वगैरे मागायची गरज नाही”, असेही ते म्हणाले.