मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याासाठी जालन्यातील अमरावाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले होते. पण, सरकारने अटी मान्य केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी १७ व्या दिवशी उपोषण सोडलं. जरांगे-पाटील यांच्या उपोषणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

“इंडिया आघाडीवरील बैठकीचं लक्ष वळवण्यासाठी जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं. त्यानंतर गृहमंत्र्यांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा : ठाकरे गटातील खासदाराकडून राहुल नार्वेकरांचा ‘सरडा’ असा उल्लेख; म्हणाले, “अनेक पक्षांचे रंग…”

नाना पटोले म्हणाले, “इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ३१ ऑगस्टला जरांगे-पाटलांना उपोषणास बसवलं होतं. त्यानंतर १ सप्टेंबरला ३ ते ४ च्या दरम्यान सौम्य लाठीचार्जचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. इंडिया आघाडीवरील लक्ष वळवण्याचं पार भाजपा आणि येड्याच्या सरकारनं केलं आहे.”

हेही वाचा : “फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले ‘बोलून मोकळं मोकळं व्हायचं’. हे फक्त दोन समाजात भांडण लावणार सरकार आहे. सौम्य लाठीचार्ज झाल्यावर फडणवीसांनी माफी मागितली. खरेतर फडणवीसांनी माफी नाहीतर राजीनामा द्यायला हवा होता. एकमेकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारनं करू नये. ओबीसी आग आहे. ओबीसीत आल्यावर जाळल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

Story img Loader