एकनाथ शिंदे बंडखोरीप्रकरणावरून मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील काही आमदार गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमागे भारतीय जनता पार्टी असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सुरतमधून सुटून आलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी देखील भाजपावर खळबळजनक आरोप केले आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाचाच हात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या सर्व प्रकरणावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाष्य केलं आहे. त्यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवरून एक मीम शेअर करत भारतीय जनता पार्टीला खोचक टोला लगावला आहे. “दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणे ही भाजपाची जुनी खोड आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

What Jitendra Awhad Said?
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा टोला, “…तर धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृत्या वापरण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारताना दिसत आहेत. नाना पटोले यांची ही फेसबूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

दुसरीकडे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. बंडखोर आमदारांनी मुंबईत येऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली मागणी मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, त्यांनी २४ तासांत मुंबईत या, असं आवाहन देखील संजय राऊतांनी केलं आहे.

Story img Loader