ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीवरुन काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगली आणि धारावीतल्या जागांवर उद्धव ठाकरेंना थेट आघाडी धर्म पाळला नाही असं म्हणत आठवण करुन दिली आहे. तसंच या जागांचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तर संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांना खिचडी चोर संबोधलं आहे.

काय म्हटलं आहे संजय निरुपम यांनी?

अमोल किर्तीकर खिचडीचोर आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांना उमेदवारी कशी दिली? उद्धव ठाकरेंनी आघाडीचा धर्म पाळला नाही. एवढंच काय तर खिचडी चोराला उमेदवारी दिलीच कशी असा प्रश्न विचारला आहे. इतकंच काय आम्ही खिचडी चोराचा प्रचार करणार नाही काही प्रश्नच येत नाही असा आक्रमक पवित्रा संजय निरुपम यांनी घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे.

Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…

संजय निरुपम अमोल किर्तीकरांना खिचडी चोर का म्हणाले?

संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकरांना खिचडी चोर म्हटलं कारण करोना काळात गरीबांना खिचडी देण्याचं जे कंत्राट आहे त्यात अमोल किर्तीकरांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना ईडीचं समन्सही पाटवण्यात आलं आहे. ठाकरे गटाने १७ नावांची यादी जाहीर केली. मात्र त्यातल्या सांगलीच्या चंद्रहार पाटील यांच्या नावावरुन आणि मुंबई उत्तर पश्चिम मधल्या अमोल किर्तीकरांच्या जागेवरुन काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा- “उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी

संजय निरुपम म्हणाले की, उबाठा गटाने ज्यांची उमेदवारी जाहीर केली ते अमोल किर्तीकर हे भ्रष्टाचारातील आरोपी असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्याचा एक चांगला उपक्रम सुरू केला होता. मात्र ठाकरे गटाच्या लोकांना हे खिचडी वाटप करण्याचे कंत्राट दिले गेले. या कंत्राटात कमिशन खाल्ल्याचा आरोप अमोल किर्तीकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गरीब कामगारांची खिचडी खाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी का देण्यात आली आहे? असं म्हणत त्यांनी अमोल किर्तीकरांचा उल्लेख खिचडीचोर असा केला आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता निरुपम यांना ठाकरे गटाकडून उत्तर दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader