Vasant Chavan Died : नांदेड जिल्ह्यातील किनवटचे माजी आमदार सुभाष जाधव, नांदेडचे प्रकाश खेडकर तसेच २०१४ साली मुखेडहून विधानसभेवर निवडून गेलेले गोविंद राठोड यांच्यानंतर वसंत बळवंतराव चव्हाण हे पदावर असताना मृत्यू पावलेले जिल्ह्यातील चौथे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. त्यांच्या निधनामुळे जिल्ह्यात नजीकच्या काळात लोकसभेची पोटनिवडणूक अपरिहार्य झाली आहे.

नांदेडच्या राजकीय इतिहासात चांगल्या घटनांसोबत वेगवेगळ्या कालखंडात काही वाईट आणि दुर्दैवी प्रसंगांचीही नोंद झाली आहे. १९५१-५२च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून १९८४-८५ पर्यंत जिल्ह्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्याचा प्रसंग अथवा कारण घडले नव्हते. पण १९८६ साली शंकरराव चव्हाण यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर १९८७ साली जिल्ह्यात पहिल्या पोटनिवडणुकीसह अशोक चव्हाण यांच्या राजकीय पदार्पणाची नोंद झाली होती.

Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
amruta fadnavis on nanakram nebhnani gunfor women
Amruta Fadnavis on Women Safety: “दोन-चार चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
statue Shivaji Maharaj, Malvan Rajkot fort,
मालवण: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; पंतप्रधान मोदींनी ८ महिन्यांपूर्वी केलं होतं अनावरण
Ajit Pawar News
Ajit Pawar : अजित पवारांनी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना झापलं, “तुम्हाला इथे काय…”
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News Live : आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडलं

हे ही वाचा… Maharashtra News Live : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुढच्या म्हणजे १९९०च्या दशकात जिल्ह्यात विधानसभेच्या दोन पोटनिवडणुका झाल्या. १९९२ साली किनवटचे तत्कालीन आमदार सुभाष जाधव यांचे अपघाती निधन झाल्यामुळे त्याच वर्षात तेथे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भीमराव केराम यांच्या अनपेक्षित विजयाची नोंद झाली. याच दशकाच्या अखेरीस बिलोलीचे तत्कालीन आमदार भास्करराव पाटील खतगावकर हे १९९८ साली लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे बळवंतराव चव्हाण निवडून आले होते.

पुढील काही वर्षांनी सन २००३ सालच्या गणेशोत्सवाच्या समारोपदिनी नांदेडचे तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांचे श्री विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान अचानक निधन झाले. त्यानंतर वर्षभराचा कालावधी असतानाही या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली नाही. पण नंतरच्या विधानसभा निवडणुकीत खेडकरांच्या पत्नी अनसूयाताई शिवसेनेतर्फे उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या.

सन २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघात माजी नगराध्यक्ष गोविंद राठोड हे भाजपातर्फे निवडून आले होते, पण आमदारकीची शपथ घेण्यापूर्वी नांदेड-मुंबई रेल्वे प्रवासातच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे या मतदारसंघात २०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राठोड यांचे पुत्र डॉ.तुषार पहिल्या प्रयत्नातच आमदार झाले.

आमदारांच्या निधनामुळे किंवा राजीनाम्यामुळे तीन मतदारसंघांनी पोटनिवडणुकांचा अनुभव घेतल्यावर अलीकडेच लोकसभेवर निवडून गेलेल्या काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचे दोन आठवड्यांच्या आजारपणानंतर २६ ऑगस्ट रोजी निधन झाल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात आणखी एका पोटनिवडणुकीची नोंद होईल.

हे ही वाचा… Deepak Kesarkar : “अशा प्रकरणांनंतर संपूर्ण सिस्टम बदलावी लागेल”, बदलापूर प्रकरणी दीपक केसरकरांचं महत्त्वाचं सुतोवाच; शाळांमध्ये पॅनिक बटण लावणार?

नांदेड लोकसभा मतदारसंघाला शंकरराव चव्हाण, केशवराव धोंडगे, व्यंकटराव तरोडेकर, अशोक चव्हाण, सूर्यकांता पाटील, भास्करराव खतगावकर इत्यादी दिग्गजांची परंपरा आहे. या नामावलीत सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरू करणार्‍या ७१ वर्षीय वसंतरावांचे नाव अलीकडेच विराजमान झाले. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी (२५ जून) लोकसभेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झाले. या काळात जिल्ह्यातील काही महत्त्वाचे प्रश्न संबंधितांसमोर मांडले. रखडलेल्या नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या विषयातही त्यांनी लक्ष घातले होते.

वसंतरावांनी १५ ऑगस्ट रोजी ७१व्या वर्षात पदार्पण केले होते. पण त्याच्या दोन दिवस आधी श्वास घेण्यास झालेल्या त्रासामुळे त्यांना आधी नांदेडच्या आणि मग हैदराबादच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. तब्बल दोन आठवडे त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता. पण हा संघर्ष २६ ऑगस्टच्या पहाटे थांबला. तब्बल साडेचार दशकांचा राजकीय प्रवास मागे ठेवून या नेत्याने सार्‍यांचाच निरोप घेतला.