राजधानी दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार कुणाकडे असणार? यावर २०१५ पासून दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव सुरू आहे. ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या राज्य सरकारला असल्याचा निकाल दिला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने एक नवा अध्यादेश काढून प्रशासकीय अधिकार पुन्हा एकदा नायब राज्यपाल यांच्याकडे असतील असे संकेत दिले आहेत. राजधानी दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडून पुन्हा काढून केंद्र सरकारने एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशामुळे नक्कीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याचा ऊहापोह काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयासमोर नक्कीच होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा