मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतमोजणी होणार आहे. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला विलंब लागू शकतो. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाते. त्यातील बाद मते बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जातो.

हेही वाचा >>> मुख्य सचिवपदावरील पुरुषी मक्तेदारी मोडीत

10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
BJP vs Congress which political party has bigger bank balance
BJP vs Congress : भाजपा आणि काँग्रेस… दोन्ही पक्षांच्या बँक बॅलन्समध्ये नेमका फरक किती? निवडणूक आयोगाच्या डेटामधून समोर आली माहिती
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
margin of victory in elections depends on voter participation IISER Pune developed model
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल
guardianship of Akola district is with Adakash Fundkar print politics news
अकोल्याला सलग चौथ्यांदा बाहेरची पालकमंत्री; समन्वय राखून प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान

उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवढी मते मिळावी लागतात. तेवढा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास दुसऱ्या फेरीची मतांची मोजणी केली जाते. ही प्रक्रिया फारच किचकट असते. एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास जेवढी पसंतीक्रमाची मते असतात तेवढी सारी मते मोजावी लागतात. तेवढे करूनही उमेदवाराला मतांचा कोटा पूण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. ही मतमोजणीची प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे. यामुळे मतमोजणीला बराच वेळ लागतो. कोकण पदवीधरमध्ये १ लाख ४०हजारांच्या आसपास मतदान झाले. तेथे मतांचा कोटा पहिल्या फेरीत उमेदवार पूर्ण करू शकला नाही तर मतमोजणीला वेळ लागू शकतो. मुंबई शिक्षकमध्ये कमी मतदार असल्याने तेथील निकाल लवकर लागेल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader