काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचारसभा आटोपून परतत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. भंडाऱ्याजवळच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी त्यांची प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले हेदेखील थोडक्यात बचावले आहेत. यानंतर काँग्रेसने घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
gunratna sadavarte sharad pawar news
“एसटी कर्मचाऱ्याच्या संपात शरद पवार, उद्धव ठाकरेंची माणसं”; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप; म्हणाले, “ज्या कृती समितीने…”
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
eknath shinde reaction on manoj jarange
Eknath Shinde : “देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप खोटे, मराठा आरक्षणासाठी त्यांनी…”; मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Tension in Koregaon Constituency due to banner tearing
फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदार संघात तणाव, दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”

काँग्रेस नेते अतुल लोंढे काय म्हणाले?

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का, अशी शंकाही अतुल लोंढेंनी उपस्थित केली आहे. या सगळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नाना पटोलेंशी माझं बोलणं झालं -फडणवीस

“मला वाटत नाही की नानाभाऊ घातपात वगैरे काही म्हणतील. मी स्वतः नाना पटोलेंना फोन केला होता. विचारपूस केली. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक सामना हा सातत्याने सुरु असतो. पण नाना पटोले हे आमचे मित्रच आहेत. अपघात झाला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती ना उद्भवली आहे ना उद्भवणार आहे. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.