ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा होती. या सभेतून त्यांनी शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकास्र सोडलं. आम्हाला निवडणूक आयोगाचा निर्णय अमान्य आहे, असंही त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो, असा टोला दीपक केसरकरांनी लगावला. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”

‘निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबद्दल विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही मान्य नसतो. त्यांना काहीच मान्य नसतं. प्रत्येकाला बरखास्त करण्याची त्यांना सवय झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात वेळ कसा काढायचा, हे सगळं त्यांनी केलं. आम्ही काही केलं नाही. आम्ही नेहमी त्यांचा आदर ठेवला आहे. आज एवढे मोठे-मोठे निर्णय महाराष्ट्रात होत आहेत, असे निर्णय त्यांच्या काळात का झाले नाहीत, हाही प्रश्न आहे.”

हेही वाचा- “आधे इथर गए आधे उधर गए, अकेले असरानी..”, उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांची खोचक टीका! ‘शोले’तील जेलरशी केली तुलना

“शेवटी जनतेला न्याय द्यावा लागतो, तो तुम्ही देऊ शकला नाहीत. म्हणून तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. आम्ही तुमचं पद काढून घेतलं नाही, आम्ही तुम्हाला सांगत होतो, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु मूळ विचारधारेबरोबर राहा, एवढीच आमची अपेक्षा होती. लोकांनी ज्या कारणासाठी निवडून दिलंय, त्यासाठी राहा. पण तुम्ही आमचं ऐकलं नाही म्हणून तुमचं पद गेलं. दुसरं कशामुळेच पद गेलं नाही,” अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.

Story img Loader