सिंधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे नकारात्मकता सोडून राजकीय मतभेद विसरून “सकारात्मक” विचारांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करू. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच आमचा शत्रू आहे, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. तसेच यापुढे भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यापुढे सगळ्या निवडणूका लढवणार का याबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, असे वक्तव्यही केसकरांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

हेही वाचा- “सर्वांना वाटतं हे सरकार थोडं आधीच यायला हवं होतं, पण…”, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Manisha Achadaye issued notice to contractor over stalled sports complex work in VTC ground
महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराला नोटीस, बदल्यांच्या निर्णयालाही स्थगिती
right to privacy is guaranteed under Article 21 of the Constitution
आरोपींनाही गोपनीयतेचा मूलभूत अधिकार आहेच!
MLA hemant Rasane treatment Guillain Barre syndrome patients
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
recruitment of professors loksatta
विश्लेषण : प्राध्यापक भरतीचे होणार काय?
Man who killed for Rs 100 gets seven years in prison pune news
पुणे: शंभर रुपयांसाठी खून करणाऱ्याला सात वर्ष सक्तमजुरी

सिंधुदुर्गात सीसीटिव्ही कॅमेरा लावणार

आगामी निवडणुका ह्या शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवण्यात येतील. त्याचा “फॉर्मुला ” वरिष्ठ स्तरावर ठरेल, त्याप्रमाणे पुढील भूमिका घेऊ असेही केसरकर म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. जेणेकरून चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य होईल.

हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…

जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा शत्रू

तर सिधुदुर्ग जिल्हा आता भयमुक्त झाला आहे. त्यामुळे जुने विरोध पुन्हा-पुन्हा न काढता पुढील राजकारण विकासाच्या दृष्टीने केले जाईल. जिल्ह्याचा न झालेला विकास हाच माझा आता शत्रू आहे, असेही मत केसकरींनी व्यक्त केले.

Story img Loader