रत्नागिरी : करोना काळात थांबवलेली भरती प्रक्रिया कोकण रेल्वे प्रशासनाने पुन्हा चालू करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्त कृती समितीने केली आहे. समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले की, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने यापूर्वीच जनता दरबार लावण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केलेली आहे. पण त्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनसुद्धा महामंडळाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत सामावून घेण्यासाठी अन्य कोणतेही पाऊल उचललेले नाही. करोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेने कंत्राटदारामार्फत भरती करतानाही प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यकारी संचालक संजय गुप्ता यांना वेळोवेळी निवेदने दिली. पण त्यावर कार्यवाही झालेली नाही. कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीच्या वेळी शेतक-यांच्या जमिनी घेण्यासाठी आटापिटा केला गेला. या जमिनी कवडीमोल दराने घेऊन प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर, मनुष्यबळाची गरज असताना कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमले जात आहेत. यापूर्वी एकाच सात-बारावरील ८ ते ९ लोक नोकरीत घेण्यात आले. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. प्रकल्पग्रस्तांना कुशल असे प्रशिक्षण देऊन सेवेत रुजू करून घेतले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा