मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा जरांगेंनी केलाय. यावरच आता फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. जरांगेंनी केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल, असे फडणवीस म्हणाले. ते आज (२५ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“सागर बंगल्यावर कोणीही येऊ शकतं”

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सागर बंगला हा सरकारचा आहे. सरकारी काम घेऊन कोणीही या बंगल्यावर येऊ शकतो. मनोज जरांगे हे कोणत्या निराशेतून बोलत आहेत. त्यांना कोणती सहानुभूती घ्यायची आहे, याची मला कल्पना नाही. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ते धादांत खोटं बोलत आहेत. मराठा आरक्षणासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. आजचा सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा विद्यार्थी, तरुणांसाठी आशेचं स्थान आहे. त्याची सुरुवात मी केलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांत वाढ केलेली आहे.

vasai bjp aggressive
कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते हवालदिल; केंद्रात, राज्यात सत्ता, मात्र वसईत कुणी दाद देईना
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
Aditya Thackeray criticized the Shinde government
शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
sanjay raut anil deshmukh marathi news
Sanjay Raut: “नागपूरमुळेच आम्ही कारागृहात”, भाजप नेत्यांचे नाव न घेता संजय राऊत म्हणाले…
Nitesh Rane, Uddhav Thackeray, Maharashtra, Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray, BJP, criticism, Maratha reservation, Manoj Jarange, Nana Patole, Sharad Pawar, police,
नितेश राणे यांचा घरचा आहेर, म्हणाले “काही अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभाग बदनाम”

“कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज…”

“मराठा आरक्षण मी उच्च न्यायालयात टिकवलेलं आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. माझं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ज्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती, ते मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवू शकलेले नाहीत. त्यामुळे कोणाच्या म्हणण्यावर मराठा समाज विश्वास ठेवेल हे माणणाऱ्यांत मी नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“…तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल”

मनोज जरांगे यांना खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फूस आहे, असा अप्रत्यक्ष आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मनोज जरांगे जी स्क्रिप्ट बोलत आहेत, तीच स्क्रिप्ट याआधी उद्धव ठाकरे बोलत होते. ज्या स्क्रिप्टवर शरद पवार बोलत होते, नेमके तेच विषय मनोज जरांगे मांडत आहेत. त्यांनी हेच विषय का मांडावेत असा प्रश्न मला पडला आहे. याच कारणामुळ जरांगेंच्या पाठीशी कोण आहे, याची काहीशी कल्पना आमच्याकडे आहे. योग्य वेळी ती बाहेर येईल. तुर्तास एवढंच आहे की कायदा, सुव्यवस्था न बिघडवता कोणीही आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. मात्र कायद्याचे पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल.