मागील काही दिवसांपासून भाजपाने मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. भाजपाने काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर आज जालना शहरातही जलआक्रोश मोर्चा काढून भाजपाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने आमच्या काळातील सर्व योजनांचा खून केला. या योजना सुरु झाल्या असत्या तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला असता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे

Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
navi mumbai municipal corporation beggars loksatta news
नवी मुंबई : शहरात भिकाऱ्यांचा उपद्रव; पालिका, पोलीस प्रशासन उदासीन
177 crores stuck with developers of Pune customers
घरही मिळेना अन् पैसेही मिळेनात! पुण्यातील ग्राहकांचे विकासकांकडे १७७ कोटी अडकले
Three drunken arrested for assaulting policemen
मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Prime Minister Modi will inaugurate the All India Marathi Literature Conference to be held in Delh
व्यासपीठावर बसण्यासाठी रुसवे-फुगवे! संमेलनाच्या आयोजकांना राजशिष्टाचारामुळे त्रास
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

“आमचं सरकार असताना मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचा आम्ही प्लॅन केला होता. मराठवाडा ग्रीडची योजना तयार केली होती. मराठवाड्याची ११ धरणे एकमेकांना जोडून प्रत्येक घरात नळ देऊन मराठवाड्यातील एकाही घरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही अशा प्रकारची ग्रीड योजना केली होती. त्याचे डेंटर काढून काम सुरु केले होते. पण हे सरकार आलं आणि या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा खून केला,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हेही वाचा >>> “विस्थापित मावळ्यांना संघटित करून…”; स्वराज्य संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपतींनी केली महत्त्वाची घोषणा

तसेच “महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात मराठवाडा ग्रीड योजनेसाठी एकही पैसा दिलेला नाही. मराठवाडा ग्रीड तयार झालं असतं तर एकाही शहराला एकाही गावाला पिण्याच्या पाण्याचा खंड पडला नासता. मराठवाड्यात दुष्काळ पडल्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा संघर्ष होतो. जायकवाडीमध्ये पाणी सोडायचं की नाही यावर संघर्ष होतो. या सरकारने आमच्या योजनांचा खून केला. पाच-सात वर्षे लागली असती पण मराठवाड्यात पाण्यासाठी मोर्चे निघाले नसते. मराठवाड्यातील शेतकरी सिंचनासाठी त्रासला नसता,” असे देवेंद्र फडणीस म्हणाले.

Story img Loader