निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना म्हणून ओळख मिळालेली आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोग, शिंदे गट तसेच भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता या माध्यमातून मिळवलं आहे. तसेच त्यासाठी गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं, असा दावा राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या याच आरोपाला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या आरोपांवर शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> “उद्धव ठाकरेंनी धमकीच दिली,” भगतसिंह कोश्यारींच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, “माझ्या माहितीनुसार…”

Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
Uddhav Thackeray Shiv Sena Will Contest Local Body Polls Alone Sanjay Raut
अक्षय शिंदेप्रमाणे त्यांचाही एन्काऊंटर का नाही? विशाल गवळी, संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत संजय राऊत यांची टीका
sanjay raut
Sanjay Raut : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया, “राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे बळी…”

अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ

“राजकारणात माणूस कधी वर जातो, कधी खाली जातो. मात्र इतकं निराश होऊन, मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव करतात. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटतं, की आपण ज्यांना मोठे नेते म्हटलं तेच नेते संजय राऊतांसारखं निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ,” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> ‘माझा विनायक मेटे करण्याचा डाव,’ अशोक चव्हाणांच्या आरोपानंतर प्रताप पाटील चिखलीकर आक्रमक; म्हणाले “त्यांनी…”

संजय राऊतांनी काय आरोप केला?

संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन शिवसेना तसेच धनुष्यबाणाबाबतचा निर्णय घेतला, असा दावा केला आहे. “निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी आणि ‘मेरी मर्जी’वाल्यांच्या मर्जीसाठी दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह हे दडपशाही, दबाव, पैसा, सत्ता यामाध्यमातून मिळवलं आहे. गेल्या ५ महिन्यांत २ हजार कोटींचं पॅकेज वापरण्यात आलं. याचे काय परिणाम होणार याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयात आम्ही धाव घेतली आहे,” असं राऊत म्हणाले.

Story img Loader