राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपाच्या हाती पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आल्या आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. याआधी मागील अडीच वर्षांमध्ये भाजपाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विरोधी बाकावर असताना सत्तापरिवर्तन व्हावे असे का वाटत होते याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. या सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती दिली. तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक दिवसही झोपू द्यायचे नाही, अशी पहिल्या दिवसापासून मनात खूणगाठ बांधली होती, असे फडणवीस यांनी सांगितले. ते नवी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा