पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ साली दंगल झाली होती. याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्यास सांगितलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांची मागणी काय?

“आयोगाने मला बोलण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसासाठी बोलवावे. तसेच, २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

हेही वाचा : शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

“आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे”

याबद्दल मुंबईत प्रसारमाध्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारल्यावर ते म्हणाले, “याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले होते. त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता, तो घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.”

हेही वाचा : “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी…”, ‘त्या’ विधानावरून शिंदे गटातील खासदाराचा गंभीर आरोप

“राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी अन्…”

“प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत. प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे, आयोगासमोर कोणाला बोलवावं आणि कोणास बोलवू नये. पण, राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करत असतात,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली.

Story img Loader