काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे सुरतमधील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाचीही माफी मागत नाही,” असं विधान राहुल गांधी यांनी केलं.

राहुल गांधी यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे. सावरकरांच्या समर्थनार्थ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने “गौरव यात्रा’ काढली. या यात्रेतून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. जे सोन्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आले, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणत आहे, अरे जरा शरम करा, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्र सोडलं.

What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Sanjay Raut
Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाने हिंदुत्व..”
bajrang punia replied to brij bhushan singh
“विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करणारे…”; बृजभूषण शरण सिंह यांच्या ‘त्या’ टीकेला बजरंग पुनियांचे जोरदार प्रत्युत्तर!
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis: “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं ही काँग्रेसची शिकवण, आता…”, मविआच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस यांची टीका

देवेंद्र फडणवीस ‘गौरव यात्रे’त म्हणाले, “जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतायत. अरे थ्थू तुमच्यावर! जरा शरम करा, अशा निर्लज्ज लोकांवर टीका करायलाही मला लाज वाटते. कारण त्यांची तेवढी पात्रता नाही. जे स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजू शकत नाहीत. अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव सांगता, त्या पक्षाच्या नेत्यांनीदेखील सावरकरांचा गौरव केला. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनीही सावरकरांचा गौरव केला.”

हेही वाचा- “…तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल!

“तुम्ही कुठले कालचे आलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवर म्हणता, पण दुर्दैव एक अजून आहे, ते माफीवीर म्हणतायत आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे मित्र बसले आहेत. खरं म्हणजे, ही इतकी शरमेची गोष्ट आहे की, काँग्रेस दररोज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करत आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- “…आधी स्वत:च्या कानफटात मारून घे”, ‘त्या’ प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

“उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसच्या मुखपत्राने सावरकर समलैंगिक होते, अशाप्रकारचा एक अंक काढला. तेव्हाही उद्धव ठाकरे त्यांचा (काँग्रेस) निषेध करू शकले नाहीत. कारण खुर्ची महत्त्वाची होती. आताही जेव्हा सावरकरांचा अपमान होतो, तेव्हा ‘आम्हाला हे चालणार नाही’, ‘आम्हाला हे चालणार नाही” असं म्हणतात. पण हे सगळं चालूच आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.