राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. आज झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे ९ तर एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या नावांवरून जोरदार चर्चा सुरू झाली असून सर्वाधिक आक्षेप संजय राठोड यांच्या समावेशावर घेतला जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर प्रचंड टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना संजय राठोड प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका व्हायरल होऊ लागली आहे.

चित्रा वाघ यांनीही घेतला आक्षेप

संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

marathi Vishwa sammelan Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: “मराठी माणूस कलहशील, त्याला…”, मी पुन्हा येईनची री ओढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुमासदार भाषण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
loksatta article on constitutional ethics
घटनात्मक नैतिकता म्हणजे नेमके काय?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या…”, या वक्तव्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव; म्हणाले, “मी गंमतीने…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड आणि तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर तीव्र आगपाखड केली होती. मात्र, एकीकडे त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली असताना आता देवेंद्र फडणवीसांनी कधीकाळी उद्धव ठाकरेंवर या प्रकरणावरून केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. यामध्ये संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी करतानात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जाब विचारला होता.

काय म्हणाले होते फडणवीस?

सर्व पुरावे असतानाही काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप फडणवीसांनी १ मार्च २०२१ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला होता. “पूजा चव्हाण प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची जी केविलवाणी स्थिती झाली, ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. सर्व पुरावे असतानाही धडधडीत खोटं बोलत काही घडलंच नाही, असं दाखवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न पत्रकार परिषदेत मास्कमधून देखील दिसत होता. मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं, की बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप्स खऱ्या आहेत की खोट्या? यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं? माध्यमांनी जे काही बाहेर काढलंय, ते खरं की खोटं? पण एवढं झाल्यावरही जर कोणाला साधूसंत ठरवायचंच असेल, तर जरूर त्यांनी ठरवावं. यातून तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येतं”, असं फडणवीस म्हणाले होते.

Pooja Chavan Case : “मुख्यमंत्र्यांनी फक्त एवढंच सांगावं…”, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल!

दरम्यान, एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेची आठवण केली जात असताना दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा या प्रकरणी केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जारी केलेल्या व्हिडीओमध्ये किरीट सोमय्या संजय राठोडांच्या अटकेची मागणी करत आहेत. “संजय राठोडांची हकालपट्टी नाही, तर अटक व्हायला हवी. पूजा चव्हाणची आत्महत्या नसून हत्या आहे. संजय राठोड यासाठी जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासाठी शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहात आहेत का?” असा सवाल किरीट सोमय्या या व्हिडीओमध्ये करत आहेत.

दरम्यान, संजय राठोड यांच्या समावेशामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून तीव्र शब्दांत टीका केली जात आहे.

Story img Loader