राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. आज झालेल्या शपथविधी समारंभात भाजपाचे ९ तर एकनाथ शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, आता मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मंत्र्यांच्या नावांवरून जोरदार चर्चा सुरू झाली असून सर्वाधिक आक्षेप संजय राठोड यांच्या समावेशावर घेतला जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोडांवर प्रचंड टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपा सरकारमध्ये त्यांचा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आता देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना संजय राठोड प्रकरणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका व्हायरल होऊ लागली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा