उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रगतिशील आणि ‘सर्वजन हिताय सर्वजन सुखाय’ असा असून सर्व समाजघटकांना दिलासा देणारा आहे. त्यांचा विचार करणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाचा विचार पुढे नेणारा आहे. मी अजित पवार यांचे अभिनंदन करतो. महिला, युवा आणि शेतकऱ्यांना समर्पित असा हा आजचा अर्थसंकल्प आहे. सातत्यपूर्ण विकासाचा यात निर्धार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

domestic gas News
Annapurna Yojana: महाराष्ट्रातील कोणत्या कुटुंबांना वर्षाला तीन घरगुती सिलिंडर मोफत मिळणार?
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

हेही वाचा – “चादर लगी फटने, खैरात लगी बटने”; अर्थसंकल्पावरून जयंत पाटलांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “अत्यंत बेजाबदार…”

पुढे बोलताना त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांची माहितीही दिली. “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून प्रतिमाह १५०० रुपये देण्यात येणार असून यासाठी ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ३ सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, असंही त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवकांना १० हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेच्या माध्यमातून ४५ लाख शेतकऱ्यांना वीजमाफी दिली जाणार आहे. यासाठी ७७७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. तसेच सौर ऊर्जा योजना याच्या अंमलबजावणीचा विचार सुद्धा केला आहे. १८ महिन्यात ही योजना पूर्ण करायची आहे, त्यामुळे ३० टकाके अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देऊ शकणार आहोत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर, “अडीच वर्षे ज्यांनी लाडका बेटा..”…

“मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. या हवेतील घोषणा नाहीत, तर विचारपूर्वक घेतलेले निर्णय आहेत. हा थापांचा नाही, तर माय-बापांचा अर्थसंकल्प आहे”, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे विरोधकांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. पुढे बोलताना, “कोरोना, दुष्काळी वर्षात दरडोई उत्पन्नात कमी-अधिक होणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही प्रगत राज्याच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. आर्थिक बेशिस्तीकडे राज्य जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.