सोलापूर : राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या संसद भवनाचे उद्योगमंत्री होत असल्याचा निषेध करीत या संपूर्ण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेससह विरोधकांच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस तुटून पडले. विरोधकांचा हा शुध्द दुटप्पीपणा आहे. त्यांचा संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा >>> VIDEO: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भगवंत मान यांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान

गुरूवारी, सोलापुरात आले असता प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी नव्या सःसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्यावर भाजपेतर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचा कडक शब्दांत समाचार घेतला. एकीकडे अवघ्या तीन-चार वर्षात बांधलेल्या नवीन संसद भवनाचे जगभरात कौतुक होत असताना दुसरीकडे विरोधकांना  या देशाशी, लोकशाही आणि संविधानाविषयी काही देणेघेणे नाही. नवीन संसद भवन म्हणजे देशातील १४० कोटी जनतेच्या आस्थेचे मंदिर  आहे. ते नव्या भारताच्या शक्तीचे प्रतीक आहे. परंतु राष्ट्रपतींना निमंत्रण न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणे हे विरोधकांना सहन होत नाही. यात केवळ मोदीद्वेष आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी राजकारणात राहण्यावरच मुनगंटीवारांचं प्रश्नचिन्ह; म्हणाले, “…हा यांचा मूळ स्वभाव आहे!”

देशाच्या इतिहासात यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींनी संसद  भवनातील अनेक्स वास्तुचे आणि ग्रंथालयाचे उद्घाटन केले होते. छत्तीसगढ विधानभवनाचा शिल्यान्यास केवळ खासदारपदावर असलेल्या सोनिया गांधी यांच्या हस्ते झाला होता. नितीशकुमार, ममता बॕनर्जी, के. चंद्रशेखर राव यांनी आपापल्या राज्यातील विधानभवनांतील नवनव्या वास्तुंचे उद्घाटन केले होते. त्यावेळी राष्ट्रपती वा राज्यपालांना का निमंत्रण दिले नव्हते, असा सवाल फडणवीस यांनी केला.

Story img Loader