सांगली : मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे आहेत, तर विरोधकांच्या इंजिनला डबेच नाहीत. यामुळे सबका साथ सबका विकास हे मोदींजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपलाच साथ द्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कडेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत केले.

भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज कडेगावच्या देशमुख चौकामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. पाटील यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, नीता केळकर, अमरसिंह देशमुख आदी उपस्थित होते..

construction houses mangroves, state government,
खारफुटीवर घरे बांधल्याच्या तक्रारीच्या तपासणीचे राज्य सरकारला आदेश
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
question of alternative to POP idol remains unsolved
पीओपी मूर्तींच्या पर्यायाचा प्रश्न अनुत्तरितच
Devendra Bhuyar, Asha sevika, BJP allegation ,
आमदार देवेंद्र भुयार यांची ‘लाडक्या बहिणीं’वर दादागिरी; भाजप नेत्याचा गंभीर आरोप
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
Pune potholes, Pune Municipal Commissioner,
पुणे : खबरदार… खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना आयुक्तांचा इशारा
eknath shinde
दीड कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना
vijay wadettiwar criticized raj thackeray
Vijay Wadettiwar : “राज ठाकरे हे गोंधळलेले नेते, ते सध्या…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावरून विजय वडेट्टीवारांची टीका!

हेही वाचा…काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीत जयंत पाटीलच खलनायक – माजी आमदार विलासराव जगताप

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विकास निधी देण्यात दुजाभाव का केला असा खडा सवाल खासदारांना उपस्थित केला. मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळीही भाजपलाच मदत करणार असेही ते म्हणाले. जर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, निवडून आल्यानंतर आम्हाला मदत केली नाही तरी चालेल, मात्र, दुजाभाव नको असे सांगत असताना पक्ष एकसंध राहिला पाहिजे या भूमिकेतून अध्यक्षपदाचा उपयोग सात वर्षे केला. मात्र, आमच्या पक्षातून दुसर्‍या पक्षाला मदत करण्याचे धोरण थांबवले पाहिजे असे मत व्यक्त केले.

हेही वाचा…मजुरीचे पैसे मागितले म्हणून केला खून, अलिबाग तालुक्यातील किहीम येथील घटना

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे झाले ते झाले. यापुढील काळात मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांचेच योगदान लागणार आहे. विरोधकांकडे केवळ इंजिन असून त्यामध्ये अन्य कोणाला बसण्यासाठी जागा नाही. मात्र, मोदी इंजिन असलेल्या रेल्वेला अनेक डबे जोडले असून यामध्ये सर्वांनाच विकासाची संधी आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या लसीमुळे आमच्या लोकांचे प्राण वाचले असे मत जगातील शंभर देश सोंगत असून यामुळे मोदी हे विश्‍वगुरू असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे.