आज राज्यात शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरताना दिसत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच हे सरकार केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले असून त्यांना दुसरं काहीच दिसत नाही, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आज पुणे दौऱ्यावर असताना ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”; राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले, “ऐन दिवाळीच्या तोंडावर….”

cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Devendra Fadnavis in Davos while Shiv Sena voices frustration over Mahayuti's district guardianship dispute.
Shiv Sena : मुख्यमंत्री परदेशात असताना महायुतीतील तणाव वाढला, पालकमंत्रीपदावरून पडली ठिणगी; शिवसेनेच्या नाराजीची कारणे काय?
Vijay Wadettiwar critized mahayuti government
वडेट्टीवार महायुतीवर मसंतापले,”हा काय सावळा गोंधळ सुरू आहे?

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?

“शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती आहे. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या सरकारचे कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं फिरत आहेत, हे माहिती नाही. शेतकरी संकटात असताना राज्यात सरकारचे अस्थित्त्वच दिसच नाही. विरोधी पक्ष या समस्येवर आवाज उठवत आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लेक्ष करत आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत आलेलं नाही, तर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत आले आहे. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थाशिवाय त्यांना काहीही दिसत नाही” , असा टोलाही त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला लगावला आहे.

“हे राज्याच्या संस्कृतीला परवाडणारे नाही”

“या सरकारला शेतकऱ्याचे नुकसान दिसत नाही, मंत्र्यांनी प्रवास करावा की न करावा, हे त्यांना माहिती नाही. विरोधी पक्ष जेव्हा एखादी मागणी करतो, त्याकडे जाणीवपूर्वक राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे, हे राज्याच्या संस्कृतीला परवाडणारे नाही”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा –राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का? कृषीमंत्री सत्तार स्पष्टच बोलले; म्हणाले “मंत्रीमंडळ बैठकीत…”

“…म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नाही”

“परतीच्या पावसामुळे पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवले, ते खराब झाले आहे. एकतर या सरकारने मंत्रीमंडळ विस्तार उशीरा केला, त्यात पालकमंत्र्यांच्या नावं उशीरा घोषित केली. याचा परिणाम असा झाला की, कोणतीही विमा कंपनी याबाबत शेतकऱ्यांना दिलासा द्यायला तयार नाही. ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला असताना, कुठेही पंचनामे झालेले नाहीत. याबाबत मी तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी केली” असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

Story img Loader