मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज (३० ऑक्टोबर) सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण अन्न, पाणी आणि उपचार घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला, राज्यातील अनेक गावांनी पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. मराठा समाजातील आमदारांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

दिलीप मोहिते पाटील म्हणाले, एक-दोन आमदारांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. त्यापेक्षा सगळे मिळून राजीनामा देऊ. समाजातील सगळ्या आमदारांनी राजीनामा दिला, सर्व पक्षांमधील लोकांनी तशी भूमिका घेतली तर सरकारला कायदा करणं भाग पडेल. त्यामुळे आपण सगळेजण एकत्र येऊ. समजाकरता सगळे मिळून निर्णय घेऊ.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

आमदार दिलीप मोहिते म्हणाले, आता राज्य सरकारच्या हातात कुठल्याही प्रकारचं आयुध राहिलं नाही. हे प्रकरण आता केंद्र सरकारकडे गेलं आहे. विशेष सुप्रीम कोर्टाकडे गेलं आहे. तिथे राज्य सरकारचे निर्णय लागू पडत नाहीत. आता केंद्र सरकारनेच या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी आज समाजाने जो दबाव निर्माण केला आहे, मराठा बांधव लढत आहेत. या लढ्याला १०० टक्के यश मिळेल.

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: लक्ष घालून निर्णय घेतील, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं आहे, दुसऱ्या बाजूला उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही चर्चेला येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणतिढ्याच्या केंद्रस्थानी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहेत.

Story img Loader