उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं होतं. पण, ही पूर्वनियोजित भेट होती. रयत शिक्षण संस्थेतील अडचणींबद्दल शरद पवारांबरोबर चर्चा झाल्याची माहिती दिलीप वळसे-पाटलांनी दिली.

शरद पवार यांच्या मोदी बाग निवासस्थानाबाहेर दिलीप वळसे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वळसे-पाटील म्हणाले, “रयत शिक्षण संस्थेतील काही अडचणींबद्दल अध्यक्ष शरद पवारांबरोबर चर्चा झाली. या बैठकीत रयत शिक्षण संस्थेतील अन्य पदाधिकारीही होते.”

pm narendra modi in maharashtra
“देशातील तरुणांना अंमलीपदार्थ विकून काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे”, वाशिममधील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
kailash gahlot Hanuman statement
आपचं रामायण : आता कैलाश गेहलोत म्हणतात, “मी केजरीवालांचा हनुमान”
Odisha army officers fiance sexual assault news
Priyanka Gandhi : ओडिशातील ‘त्या’ घटनेवरून राहुल गांधींसह प्रियांका गांधींचं भाजपा सरकारवर टीकास्र; म्हणाल्या, “यांचं सरकार पोलिसांना…”
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’
dr Ajit Ranade
डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याने बुद्धिवंतांमध्ये नाराजी
Baramati, Ajit Pawar, Ajit Pawar and Baramati,
बारामतीमधून उभे न राहिलेलेच बरे! अजित पवार यांचे विधान; ‘तुम्हीच आमदार हवे,’ असा कार्यकर्त्यांचा आग्रह

“अशा भेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. वसंतदादा शुगर, रयत शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, राज्य कारखाना आणि राष्ट्रीय कारखाना संघ या संस्थांवर मी काम करतोय. येथे काम करताना नेहमीच शरद पवारांचं मार्गदर्शन घेत आलो आहे. आज सहकारी संस्थांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती संदर्भात सरकारने केलेल्या उपाययोजनांबद्दल शरद पवारांशी चर्चा केली,” असं वळसे-पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा : “शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…”, बच्चू कडूंचं विधान

संस्थात्मक राजकारणात अंतिम शब्द शरद पवार की अजित पवार यांचा? या प्रश्नावर वळसे-पाटील म्हणाले, “शरद पवार अनेक संस्थांवर अध्यक्ष आहेत. त्यामुळे शरद पवार यांचाच अंतिम शब्द असणार आहे.”

“राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे. या संस्था समाजाच्या आहेत. संस्थांमध्ये शरद पवार यांनी कधीही राजकारण आणलं नाही. संस्थांमध्ये सर्व पक्षांची लोक आहेत,” असं वळसे-पाटलांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : “धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही”, अजित पवार गटातील नेत्यानं आव्हाडांना सुनावलं; दिलं ‘हे’ आव्हान

आंबेगाव ग्रामपंचायतीत बदल झाला आहे. फुटीचा फटका बसला का? असा प्रश्न विचारल्यावर वळसे-पाटील म्हणाले, “३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यात २४ सरपंच आमच्या विचाराचे निवडून आले आहेत. ४ स्थानिक आघाड्या आणि २ शिंदे गटाला मिळाल्या आहेत. आंबेगाव ग्रामपंचायतीत थोडा बदल झाला आहे. निवडणुकीत काही स्थानिक पातळीवरील प्रश्नांचा परिणाम झाला असावा. आंबेगावाला जाऊन स्थानिकांशी चर्चा करेल.”