मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : गेल्या पाच वर्षांपासून कुपोषणात घट होत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असला, तरी नागरी भागाच्या तुलनेत मेळघाटातील मध्यम कमी वजनाच्या आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण पाहता, हा प्रश्न अजूनही गंभीरच आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सुधारणा आणि इतर पायाभूत विकासाच्या वाटा प्रशस्त होत असताना रस्त्यांची स्थिती वाईट आहे.

Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
unicef report observed that education of more than 54 7 million students has affected due to heat waves in India
उष्णतेच्या लाटांचा शिक्षणाला फटका; भारतातील ५ कोटी ४७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Pune city pimpri chinchwad Guillain Barre Syndrome patient ventilator ICU
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण आणखी वाढले; १३ जण व्हेंटिलेटरवर तर २४ जण आयसीयूत दाखल
Minor girl files rape case against father for refusing to marry boy she likes
नागपूर : मुलीचा चक्क वडिलांवर बलात्काराचा आरोप, कारण वाचून बसेल धक्का…
Patients suffer due to lack of facilities at Shatabdi Hospital in Govandi Mumbai print news
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांचे हाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचा उपोषणाचा इशारा
Maharashtra Two Tiger Death, Tiger Death, pench ,
राज्यात एकाच दिवशी दोन वाघांचा मृत्यू

मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात ७ हजार ३९५ इतकी, तर तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या १८४५ इतकी आहे. हे प्रमाण अनुक्रमे २३ आणि ६ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील नागरी भागात हेच प्रमाण अनुक्रमे ३.३५ आणि ०.३१ टक्के इतके आहे. नवसंजीवनी योजना आणि ‘मिशन २८’ यासारखे उपक्रम राबवूनही मेळघाटातील कुपोषित बालकांची संख्या फारशी कमी झालेली नाही. मात्र बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे समाधान आरोग्य यंत्रणेला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra District Index : शाळांमध्ये सुविधांचा अभाव

जिल्ह्यातील ग्रामीण भागात २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, चोरी, वाहनचोरी, फसवणूक यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली घट ही समाधान मानावी अशी आहे. मात्र, मनुष्यबळाच्या अभावामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक होत असते. तपासातील गुणात्मक कामगिरी चांगली असली तरी, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचे बळ अपुरे पडत आहे. २८.८८ लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांच्या दिमतीला फक्त २ हजार ३४७ पोलीस आहेत. पोलीस दलातील ३३१ पदे रिक्त आहेत, हे विशेष.

५०९ किमी रस्ते खडीचे

गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे प्रमाण वाढलेले असताना जिल्ह्यातील फक्त ५५८ किलोमीटर रस्त्यांना ते भाग्य लाभले आहे. पण, खडीच्या रस्त्यांचे डांबरी किंवा क्राँक्रीटच्या रस्त्यांमध्ये रूपांतर कूर्मगतीने सुरू आहे. मेळघाटातील परिस्थिती बिकट आहे. अजूनही या आदिवासी भागात ५०९ किलोमीटर लांबीचे रस्ते खडीचे आहेत. जिल्ह्यात खडीच्या रस्त्यांची लांबी ही १०९७ किलोमीटर इतकी आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची लांबी सर्वाधिक ६ हजार ३७४ किलोमीटर आहे. पण, दरवर्षी पावसाळयात उखडणारे रस्ते आणि त्यावर तात्पुरती केलेली मलमपट्टी हा विषय चर्चेत येतो.

Story img Loader