“महायुतीचे प्रवक्ते नेते हल्ली जी वक्तव्ये करतात त्यातून आपल्यात विसंवाद असल्याचं चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी जपून वक्तव्ये करा”, असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना, प्रवक्त्यांना दिला आहे. शनिवारी (६ जुलै) संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, कुणाला (महायुतीतील प्रवक्ते, पदाधिकारी, नेते) एकमेकांविरोधत बोलायची खुमखुमी आली असेल तर त्याने त्याच्या नेत्यांकडे जाऊन विचारायला हवं. त्यांनी आपल्या नेत्याला जाऊन विचारावं की मला बोलायची खुमखुमी आली आहे, मी बोलू का? तुमच्या नेत्यांनी परवानगी दिली तर खुशाल बोला आणि तुमची खुमखुमी दूर करून घ्या. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आपल्याविरोधात प्रचार करत आहेत, आपण एकत्र नसल्याचा अपप्रचार करू लागले आहेत. आपण जेव्हा एकमेकांविरोधात वक्तव्ये करतो तेव्हा दुर्दैवाने त्यांच्या या प्रचाराला अधिक बळ देत असतो. अशाने आपणच हिट विकेट होतो, रन आउट होतो, ही स्थिती योग्य नाही. अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की पक्षांमधील वरिष्ठ नेते तिकीट वाटप करतील. कोणाला कुठली जागा मिळणार? हे मंचावरील वरिष्ठ नेते ठरवतील. मी, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते एकत्र बसून, चर्चा करून, एकमेकांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
BJP questioned Rahul Gandhi after a corruption case was filed against Siddaramaiah
सिद्धरामय्यांच्या पाठीशी राहणार का?भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचा राहुल गांधी यांना सवाल
Dharavi mosque illegal portion demolished
धारावी मशिद तोडक कारवाई: मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप, सपा आमदार रईस शेख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद
farmer leader raju shetty slam bjp over corruption issues in buldhana
राजू शेट्टी म्हणाले; महाराष्ट्र भाजपला आंदण दिलेला नाही; काचेच्या घरात राहणाऱ्यांनी…या शेतकरी नेत्याने थेटच….
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली

उपमुख्यमंत्री म्हणाले, आपण युतीत असतो तेव्हा प्रत्येक नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या काही इच्छा, अपेक्षा असतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आकांक्षा असल्या तरी प्रत्येक पक्षाला काही ना काही तडजोडी कराव्या लागतात आणि आपण प्रत्येकाने तडजोडीचीच भूमिका घ्यायला हवी. तडजोडीची भूमिका घेतली नाही तर युती टिकत नाहीत. मी माझं पाहून घेतो, दुसऱ्याचं काय व्हायचं ते होऊ दे, ही भूमिका चालणार नाही. असं केलं तर आपला घात होऊ शकतो.

हे ही वाचा >> “कांदा निर्यात बंदी करू नका, त्याने अनेकांना…”, अजित पवारांची पीयूष गोयल यांना विनंती

भाजपा नेते म्हणाले, आपले विरोधक लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळून गेले आहेत. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करण्यासाठी तयार आहेत. मात्र आपण ताठर भूमिका घेतल्या, मी माझ्यापुरतं बघून घेईन, दुसऱ्याचं बघणार नाही, अशी भूमिका घेतली, अशा प्रकारची मानसिकता ठेवली तर आपलं नुकसान होईल. शेखचिल्ली झाडाच्या ज्या फांदीवर बसतो तीच फांदी कापतो, आपलीही तशीच गत होईल. आपण सर्वजण राजकीय नेते आहोत. आपल्याला एकत्र चालावं लागेल. एकत्र राहून निर्णय घ्यावे लागतील. एखाद्या निर्णय आवडला नाही तर त्याबाबतची आपली मतं ही चार भिंतीत ठेवायला हवीत. चार भिंतीत संवाद साधावा. मला विश्वास आहे की आपण निर्धार केला तर आपण खूप काही करू शकतो. आपण महायुतीत २०० पेक्षा जास्त आमदार आहोत. अफाट कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आपण आगामी विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो.