हिंगोली : कोणत्याही मोठ्या उद्योगाविना चालणाऱ्या हिंगोली जिल्ह्याच्या अर्थकारणाची दशा नि दिशा हळद आणि ऊस यांच्याभोवती. २०२२मध्ये हळदीने हात दिला नि जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीने मोठी मजल मारली. पण गेल्या वर्षी हळदीचे दर घसरले आणि हिंगोलीच्या गाड्याचे चाक जागीच रुतले. निवडणूक वर्षातल्या आचारसंहितेने रस्तेबांधणीला ‘ब्रेक’ लावल्याने प्रगतीची गाडी आणखी गडगडली.
कोविडकाळात हळदीची मागणी वाढल्यानंतर २६६ किलोमीटरचा नदीकिनारा लाभलेल्या हिंगोली जिल्ह्यात हळद हेच बागायत पीक झाले. कयाधूच्या ८० किलोमीटरच्या पट्ट्यात अधिक. त्यामुळे सारे अर्थकारण हळद आणि ऊस या पिकांभोवती केंद्रित झालेले. हिंगोलीमध्ये २४ हजार हेक्टरवर हळद लावली जात असे. त्या क्षेत्रात आता मोठी वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आता ३२ हजार हेक्टरवर हळदीचे पीक घेतले जाते. हळद वाढली पण भाव गडगडले. परिणामी सारे अर्थकारण घसरले. उसाची उत्पादकता घसरली आणि हळदीचे दर. त्यात सिंचनाचा अनुशेषही शिल्लक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा