राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र जळतोय, आंदोलक आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी पडले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची सरकारची इच्छा नाही, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, “विरोधी पक्षात असताना फडणवीसांनी म्हटलं होतं की, ‘सत्तेत आल्यास मराठ्यांना आरक्षण देणार. आरक्षण नाही दिलं, तर राजकीय संन्यास घेईन.’ पण, सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. सरकार मराठा आरक्षणाबाबत उदासीन आहे.”

Maslow s pyramid loksatta
जिम्मा न् विमा : जोखमीची गुंतवणूक कोणती?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
beed politics Devendra Fadnavis Suresh Dhas pankaja munde dhananjay munde
माध्यमांमध्ये ‘ आवाज’ बनलेल्या सुरेश धस यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!

हेही वाचा : “मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? त्यांचा…”, बच्चू कडूंचा सरकारला थेट सवाल; म्हणाले…

“महाराष्ट्र जळतोय, मराठा आंदोलक आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण, एक उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. तर, दुसरे उपमुख्यमंत्री व्याधीग्रस्त आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकाके पडल्यासारखं दिसत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी सरकारची प्रामाणिक इच्छा नाही,” अशी टीका एकनाथ खडसेंनी केली.

हेही वाचा : “मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज…”, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

“मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर मंत्रिमंडळ प्रस्ताव करून विधानसभेत मंजूर करावा. नंतर केंद्र सरकारनं घटनेत बदल करून मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण द्यावं,” अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली.

Story img Loader