राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट-भाजपा सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसानभरपाई तसेच औरंगबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर, अशा अनेक निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात (नोव्हेंबर २०२२) शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला केला जाईल, असे शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> “सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका

Mumbai first subway metro, metro Mumbai,
मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सोमवारपासून धावणार, प्रवासांच्या सोयीसाठी एमएमआरसीकडून मेट्रो कनेक्ट ३ ॲप कार्यान्वित
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Mumbai Metro Rail Corporation has decided to start subway metro for passengers Mumbai print news
मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास सोमवारपासून सुरू; सोमवारी सकाळी ११ वाजता पहिली भुयारी मेट्रो धावणार 
Prime Minister Modi inaugurate Banjara Virasat Nangara Museum on October 5 in Washim
पोहरादेवीचे ‘बंजारा विरासत ‘ संग्रहालय कसे आहे? पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण
Metro 3, Aarey BKC Metro 3, Narendra Modi, mumbai,
मेट्रो ३ : आरे बीकेसी टप्प्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
Prime Minister Narendra Modi will visit Vidarbha for the second time in 15 days
पंतप्रधान १५ दिवसांत दुसऱ्यांदा विदर्भात…बंजारा समाजाची गठ्ठा मतपेढी…
changes in traffic route due to inauguration of underground pune metro route
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन
Uday Samant expressed said work of Mumbai Goa National Highway will be completed by next December
मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत

“लवकरच आपण शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्ग खुला करत आहोत. त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास सुखकर होणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा मार्ग खुला केला जाईल,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आज राज्यात बहुमत असलेले सरकार आहे. मागील तीन महिन्यात आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय राज्याच्या हिताचे आहेत. याच कारणामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३९७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे.तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे २४३ सरपंच झाले आहेत. हा आकडा आणखी वाढत आहे. या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले. विरोधी पक्ष टीका करत आहे. आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >>> “दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन…”, सरकार बडतर्फ करण्याबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका!

परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले आहे. निकषांचा विचार न करता आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आता पंचनामे करण्यास सांगितले आहे, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.