राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांना अर्थखातं देण्याला शिंदे गटाने विरोध केला. तसेच आधीप्रमाणेच ते निधीबाबत भेदभाव करतील, अशी शंका व्यक्त केली. यानंतरही अजित पवारांकडेच अर्थखातं आलं. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या चर्चांवर भाष्य केलं. ते शनिवारी (१५ जुलै) नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी सांगितलं आहे की, त्यांना सगळे लोक दबंग म्हणतात. ते कडक असल्याचं बोलतात. ते रेटून नेतात, असं म्हणतात. मात्र, तसं नाही. ते सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. आमच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जात कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेईल, असं अजित पवारांनी सांगितलं.”

Rajendra Deshmukh karjat
आमदार राम शिंदे व भाजपाला रोहित पवार यांनी दिला मोठा धक्का! भाजपाचा बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Eknath Shinde
CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन
CM Eknath Shinde
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…
CM Eknath Shinde will go guwahati once again
Eknath Shinde: निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; कारण काय? शिंदे गटाचे नेते म्हणाले…
Shinde announced his candidature for Ramtek Assembly BJP started protest against him
तिन्ही माजी खासदारांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पुनर्वसन
cm eknath shinde criticizes opposition
योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखविण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Online Bhoomi pujan of Banda to Danoli road by cm eknath shinde
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  बांदा ते दाणोली रस्त्याचे दूपदरीकरणाचे ऑनलाईन भूमिपूजन, तर रस्त्यावर बावळट येथे सभामंडप जाळला

“एकही आमदारावर अन्याय होऊ देणार नाही”

“मीही सांगतो की, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्याबरोबरच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्याबरोबरच्या २०० पेक्षा अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. कुणालाही खालची, वरची वागणूक देणार नाही. सगळ्यांना समान न्याय देण्याचं काम हे सरकार करेल,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : “मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा…”, अजित पवारांचं वक्तव्य

“देशाची मोट बांधायला निघालेल्यांचीच बोटं फुटली”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “विरोधी पक्ष वज्रमुठ करत होते. त्यांची वज्रमुठ तर वज्रझुठ ठरली. तसेच या देशाची मोट बांधायला निघालेल्यांची स्वतःचीच बोटं फुटून गेली. त्यांच्यात काहीच राहिलं नाही. त्यामुळे हे सगळे पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले, तरी एक नेता ठरवू शकत नाही. यातच मोदींचा विजय निश्चित झाला आहे.”

हेही वाचा : अर्थखातं मिळू नये म्हणून शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न, आता काय? अजित पवार म्हणाले…

“जेवढे आरोप केले तेवढ्या विरोधकांच्या जागा कमी झाल्या”

“याआधीही २०१४, २१०९ मध्ये अनेक आरोप झाले, आघाड्या झाल्या, मात्र त्यांनी जेवढे आरोप केले तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१९ मध्ये तर विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी जेवढी संख्या लागते त्यापेक्षा खाली गेले,” असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली.