कल्याण पश्चिम मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून वादग्रस्त विधान केलं आहे. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्म बदलला आहे. त्या त्यांच्याबरोबर (मुस्लीम तरुणांबरोबर) पळूनही गेल्या आहेत. त्यामुळे त्याची जमातच नष्ट करून टाकू, अशा अर्थाचं विधान विश्वनाथ भोईर यांनी केलं आहे. याबाबतचा एक व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेला व्हिडीओ १ ऑगस्ट रोजीचा असून आगरी सेनेच्या ३७ व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमातच शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समजाच्या दाराजवळ आलाय. हा मुद्दा मी सभागृहात मांडणार होतो. सभागृहात मी अबू आझमींसह इतर चार-पाच लोकांना थेट सांगणार होतो की, यांची जमातच नष्ट करून टाकू, असं विधान भोईर यांनी केलं. त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Suresh Dhas On Jitendra Awhad
Suresh Dhas : “अक्षय शिंदेची वाहवा करणारे…”, आमदार सुरेश धस यांचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
eknath shinde anand dighes film became super hit and our Vidhansabha picture also became super hit Now we want to make third film
खासदार फुटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
MLA Jitendra Awhad reaction after badlapur rape case accused akshay shindes parents withdraw the case
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, “…तर अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार, हे नक्की”
veer pahariya first reaction after marathi comedian pranit more assaulted
“कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा…”, प्रसिद्ध मराठी कॉमेडियनवरील हल्ल्याबाबत वीर पहारियाचं स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”

हेही वाचा- भर बैठकीत अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा; थेट अंगावर गेले धावून, नेमकं कारण काय?

यावेळी विश्वनाथ भोईर म्हणाले, “लव्ह जिहाद हा आगरी-कोळी समाजाच्या दाराजवळ आलाय. एकदम दाराजवळ आलाय. दाराजवळ नाही तर घरात घुसलाय. कुठल्यातरी एक-दोन मुलींनी लव्ह जिहादला बळी पडून आपला धर्मसुद्धा बदललाय. त्या त्यांच्याबरोबर पळूनही गेल्या आहेत. इथे कुणी फेसबूक किंवा व्हॉट्सअॅप वापरत असाल तर त्यांनी ते ऐकलं असेल. सभागृहात बोलण्याचा माझा विषयही तोच होता. सभागृहात अबू आझमी आणि अजून चार-पाच लोक आहेत. त्यांना सरळ सांगणार होतो. यांची जमातच नष्ट करून टाकू.”

हेही वाचा- “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान नसलेल्या RSSच्या कुशीत भाजपाचा जन्म”, नाना पटोलेंची टीका

विश्वनाथ भोईर पुढे म्हणाले की, भिवंडी आणि कल्याणमध्ये दंगल घडली तर सगळ्यात आधी गाववाले उभे राहायचे. आगरी कोळी उभा राहायचा. तेव्हा आपण यांची हवा टाईट करायचो. भिवंडी आणि कल्याणची दंगलही आगरी-कोळी सांभाळायचा. आता जर हे आमच्याच मुलींना जाळ्यात अडकवत असतील तर त्यांना संपवून टाकू, अशा भाषेत मी बोलणार होतो. मग मला सभागृहातून बाहेर काढलं असतं तरी चाललं असतं. मला पक्षातून काढून टाकलं असतं तरी चाललं असतं. यासाठी माझी तयारी होती.

Story img Loader