शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. संजय राऊतांमुळे भाजपासोबतची युती तुटली? त्यांच्यामुळेच पक्ष फुटला, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या या दाव्यावर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडायला लावणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांनीच पहिल्यांदा राजीनामा दिला होता, असं विधान संजय राऊत यांनी केलं. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Raut claims to contest Mumbai Municipal Corporation elections on his own Mumbai news
मुंबई महापालिका स्वबळावर, अन्य ठिकाणी मविआ; संजय राऊत यांचा दावा
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
bangladeshis issue in chhatrapati sambhajinagar municipal corporation
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी बांगलादेशींच्या मुद्द्याची व्यूहरचना; भाजप. शिवसेना, एमआयएमला विषय मिळाला
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी
bharat gogawale
पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली
BJP retains all important districts of Vidarbha in Guardian Minister post
विदर्भातील पालकमंत्री निवडीत भाजपचाच वरचष्मा

हेही वाचा- “…तर राऊतांना बाळासाहेबांनी पायाखाली तुडवलं असतं”, संजय गायकवाडांची संतप्त टीका!

‘भाजपासोबतची युती तुटणे, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात येणे, शिवसेना पक्ष फुटणे… या सर्वाला संजय राऊत जबाबदार आहेत’ या शिंदे गटाच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “ते सगळे खोटं बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजीनामा द्यायला निघालेले पहिले मंत्री एकनाथ शिंदे हेच होते. फडणवीस सरकारमध्ये आमचा छळ होतोय, असं एकनाथ शिंदेंनी जाहीरपणे सांगितलं होतं. फडणवीस सरकारमधून राजीनामा देणारे पहिले मंत्री एकनाथ शिंदेच होते.भाजपाबरोबर आम्हाला राहायचं नाही. आम्हाला मोकळं करा, असं आमच्या एकनाथ शिंदे यांनीच जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांची अनेक भाषणं आहेत, तुम्ही पाहू शकता,” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

Story img Loader