विधीमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून म्हणजेच ७ डिसेंबरपासून नागपूर येथे होत आहे. या अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने पंरपरेप्रमाणे विरोधी पक्षांना चहापानाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधी पक्षांनी या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं कारण सांगितलं. या पत्रकार परिषदेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही, आरक्षणाच्या प्रश्नामुळे संघर्ष चालू आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही, चर्चा करत नाही. राज्यापुढे गंभीर प्रश्न असताना चहापानाला जाणं योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

Amit Shah Mumbai, Amit shah news,
Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
NRC application for adhar card
आसाममध्ये आधार कार्ड बनवण्यासाठी नवा नियम; मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…
vasai Bahujan vikas aghadi marathi news
वसई: भाजप कार्यकर्त्याला मारहाण, बविआच्या दोघांना अटक
Women who are part of the crowd need self-awareness
हे आत्मभान कधी येईल?
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
national human rights commission orders police inquiry into detaining rti activist
माहिती अधिकार कार्यकर्त्याला केले नजरकैद; पोलिसांच्या चौकशीचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश
women s safety top national priority pm modi at lakhpati didi sammelan
महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी महायुतीनेदेखील पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांच्यासाठी सुपारी पान ठेवायला हवं. त्यांची सवय पाहता पानसुपारीच्या कार्यक्रमाला ते येतील.” तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन विदर्भात होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. परंतु, विरोधी पक्षांनी दिलेल्या पत्रात विदर्भाचा एकही मुद्दा नाही. तसेच या पत्रावर २३ नेत्यांची नावं आहेत. मात्र, त्यावर केवळ सातच आमदारांनी सह्या केल्या आहेत. बाकीचे नेते पत्रकार परिषदेत झोपले होते, त्याचप्रमाणे सह्या करायच्या वेळेसही झोपले असतील.

हे ही वाचा >> “विरोधकांचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “लोकसभेत याहून वाईट…!”

दरम्यान, राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायरीतून उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षांना उद्देशून म्हणाले, मुंह खोलने से पहले सोचना सीख लें, पहले तो अपने अंदर झाँक के देख लें! तुम्ही लोक आधी तुमचं बघा आणि मग सरकारवर टीका करा. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हे इंडिया आघाडीवाले खूप मोठ्या-मोठ्या बाता मारत होते. परंतु, निकलानंतर काहीच बोलत नाहीत.