देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटण्यात बैठक झाली. या बैठकीला विरोधी पक्षांनी दिलों का गठबंधन असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून हे सर्व पक्ष एकत्र आले. या बैठकीवर आता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएकडून टीका सुरू आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने या बैठकीवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या लोकांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विरोध केला, तुम्ही (उद्धव ठाकरे) काल त्यांच्याबरोबर जाऊन बसलात. त्यांच्याबरोबर दिलों का गठबंधन केलंत. म्हणूनच एक वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय घेतला तो कसा योग्य होता याची खातरजमा या पाटण्याच्या बैठकीनंतर झाली आहे.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”

एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धवजी सतत भाजपावर आरोप करायचे. मेहबुबा मुफ्तींबरोबर सरकार स्थापन केलं असं म्हणायचे. मग काल तुम्ही काय केलं. तुम्ही मुफ्तींबरोबर बसलात, गप्पा मारल्या. काल तुम्ही चारा घोटाळ्यातले आरोपी लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर बसलात. आता मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात हे लोक आंदोलन करणार आहेत. पण कुठल्या तोंडाने तुम्ही हे आंदोलन करणार आहात. या भ्रष्टाचाऱ्यांबरोबर तुमचं साटंलोटं पाहायला मिळालं.

हे ही वाचा >> “परिवारावर आलात तर…”, भाजपाचा उद्धव ठाकरेंना इशारा, म्हणाले, “मातोश्री बंगल्यावर जाऊन…”

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हे १५ पक्ष एकत्र आले. परंतु या सर्वांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर नैराश्य स्पष्ट दिसत होतं. परंतु मोदींविरोधात या लोकानी एकत्र येणं हा मोदीजींचा विजय आहे. ही मोदीजींची जीत आणि त्यांची हार आहे. अशा किती आघाड्या केल्या, किती विरोधक एकत्र आले, आरोप केले तरी जनतेनं यांच्यातल्या एकालाही ४० पेक्षा जास्त खासदार दिले नाहीत. विरोधी पक्षनेता बनवण्याइतके खासदारही यांच्याकडे नाहीत.

Story img Loader