रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांचे अपेक्षित ध्रुवीकरण झाले आहे का, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी धार्मिक ध्रुवीकरणावर विशेष भर दिल्याचे दिसून आले आहे. हा मतदारसंघही त्याला अपवाद नाही. मतदारसंघातील सहा विधानसभा सदस्यांपैकी चार महायुतीचे, तर दोन महाविकास आघाडीचे सदस्य आहेत.

हेही वाचा >>> बोगस ॲकॅडमींच्या चौकशीचे शिक्षणमंत्री केसरकरांचे आदेश

parbhani shiv sena ubt district Chief Vishal Kadam is joining eknath shindes shiv sena
मुहूर्त ठरला ! उबाठा शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गुरुवारी प्रवेश
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे…
Cm Devendra Fadnavis Statement About Suresh Dhas
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”
mirkarwada port loksatta news
मिरकरवाडा बंदराचा विकास वादाच्या भोवऱ्यात, राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेची २० लाखांच्या नुकसान भरपाईची नोटीस
Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
Solapur leopard death loksatta news
Solapur Leopard Attack : वेळापूरजवळ वाहनांची धडक बसून बिबट्याचा मृत्यू; जखमी अवस्थेत दोघांवर केला हल्ला
raigad district land deals
रायगड जिल्ह्यात जागा जमिनींचे व्यवहार जोमात, नऊ महिन्यांत पावणे तीन हजार कोटींचा महसूल जमा
Turmeric price in Sangli is Rs 21 thousand per quintal
सांगलीत हळदीला क्विंटलला २१ हजारांचा दर
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका

पण महायुतीचे कागदावरील हे बळ खरोखर पूर्ण ताकदीने वापरले गेले आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताकद असली तरी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघाने त्यांना किती हात दिला असेल, याबाबत उलट सुलट चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तर राणे येथील पालकमंत्री उदय सामंत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. पण या दोन मतदारसंघांमधून त्यांना किती आघाडी मिळेल, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोनच आमदार या मतदारसंघात असले तरी कुडाळच्या वैभव नाईक यांनी, अस्तित्वाची लढाई आणि राणेंशी राजकीय वैरामुळे सर्व ताकद पणाला लावली, असे मानले जाते. राजापूरचे या गटाचे आमदार राजन साळवी यांच्याबरोबरच विधानसभेसाठी इच्छुक काँग्रेस पक्षाचे नेते अविनाश लाड यांनीही जोर लावल्यामुळे तेथून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे मावळते खासदार विनायक राऊत यांना मतांच्या आघाडीची आशा आहे. तसे असले तरी कोकणच्या राजकारणातील मुरब्बी राणे यांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात शत्रू पक्षाची मते खेचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या लोकसभा मतदारसंघातील मुस्लीम, ख्रिाश्चन आणि दलित मतदारांनी कशा प्रकारे मतदान केले आहे, यावरही येथील निर्णय अवलंबून आहे. नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव नीलेश यांचा राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पराभव केला आहे. या पराभवाचे राणे उट्टे काढतात, की राऊत विजयाची हॅट्ट्रिक करतात, याबाबतही उत्सुकता आहे.

Story img Loader