सांगली : भाजप अन्य राज्यात वाढण्यासारखी स्थिती नसल्याने महाराष्ट्रात भाजपचे अधिक लक्ष आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असून देशाच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.

शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अन्य राज्यात भाजपला अनुकूल स्थिती दिसत नाही. यामुळे महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातूनच प्रयोग सुरू झाले. पहिला प्रयोग शिवसेनेनवर आणि त्यानंतर राष्ट्रवादीवर करण्यात आला. यापुढील काळातही असे प्रयोग थांबतील असे वाटत नाही. पक्षातून नेते बाहेर पडले ते वैयक्तिक स्वार्थासाठीच. जनतेला मूळ पक्षाशी नेत्यांनी केलेली गद्दारी आवडली नाही. फितुरी महाराष्ट्रातील जनता कधीही मान्य करत नाही.

Devendra Fadnavis At Loksatta Varshavedh
Loksatta Varshavedh : ‘वर्षवेध’ मध्ये २०२४ चा परिपूर्ण माहितीकोश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Cm Devendra Fadnavis in loksatta events
‘वर्षवेध’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन; स्पर्धा परीक्षांचा ‘वाटाड्या’ पूर्णपणे नव्या स्वरूपात
Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाचे केले कौतुक

आणखी वाचा-राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर राजकीय भूकंप? पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढची राजकीय समीकरणं…!”

आमदार अपात्र प्रकरणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असून अध्यक्षांना कायद्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. तसे जर झाले नाही तर सर्वोङ्ख न्यायालयाची काय भूमिका घेणार हे पाहायला हवे. विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर निर्णय घेतील तो पहिला भूकंप असेल. पक्षांतर बंदी कायदा हा कुचकामी असून तो कचर्‍याच्या डब्यात फेकून द्यायला हवा.

राममंदिर हे केवळ भाजपचे नाही तर तमाम रामभक्तांचे आहे.यामुळे याचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल असे वाटत नाही. लोकसभेवेळी मतदान महागाईच्या मुद्द्यावरय होईल असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीवेळी अधिकाधिक उमेदवार उभे करून मत विभाजन करण्याची रणनीती भाजपकडून आखली जाईल. मत विभाजन टाळण्याचा इंडियाचा प्रयत्न असून बहुजन वंचित आघाडीनेही इंडिया आघाडीत सहभागी व्हावे असे आपले मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा-“अजितदादाच आता ज्येष्ठ नागरिक आहेत…”, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “रोहित पवारांच्या वयात शरद पवार…”

जर नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाले तर देशाची घटनाच बदलली जाण्याची भीती व्ययत केली जात आहे. यासाठी मतदारांनीही आता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याची गरज आहे असेही आमदार चव्हाण यावेळी म्हणाले.

Story img Loader