दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्ती तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

नद्यांना पूर येऊन पाणी शेतात, वस्तीत शिरून खूप मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी दरड कोसळून, झाडे पडून घरांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील किरांबा येथील गावातील डोंगराला ५ ते ६ फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा डोंगर धोकादायक ठरत आहे.

thane traffic police did not get Solid solution
ठाणे : वाहतूक पोलिसांना ठोस उपाय मिळेना, नियोजनशुन्य कारभारामुळे प्रवास नकोसा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
police crack double murder case in savare village of palghar taluka
पालघर : घरगुती वादातून माय लेकीची निर्घुण हत्या; आरोपी दिर आणि नणंद यांना अटक
Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता

हेही वाचा…कोकणात १ ऑगस्टपासून मासेमारी सुरु होणार, मात्र वादळी वारे आणि पावसाची मच्छीमारांना चिंता

येथील ग्रामस्थांच्या हे निदर्शनास आल्यावर येथील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. येथील डोंगराला भेगा पडत गेल्याने लगतच्या रस्त्याला देखील भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता देखील बंद केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी किमान एक किमीची पायपीट करावी लागत आहे. यातच शासनाने त्याठिकाणाहून स्थलांतर करण्याचे आदेश लोकांना दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.