सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. कापूस सोयाबीनचे दर कमी झाले असून शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. सरकार जगूही देत नाही आणि मरुही देत नाही. सरकारला आमची प्रेतंच पाहायची असतील, तर अरबी समुद्रात पाहावी, असे रविकांत तुपकर म्हटलं आहे.

मुंबईला जाण्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी टी ९ मराठीशी संवाद साधला. तेव्हा बोलताना तुपकर म्हणाले, “अतिवृष्टीने सोयबीन आणि कापसाचे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई अजून मिळाली नाही. सोयाबीनचे दर कोसळले असून, उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही. कापूस आणि सोयाबीनचे दर कमी होत आहे. शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. मागील एक महिन्यांपासून आंदोलन करत असून, सरकार दखल घेत नाही.”

PM Modi visit Thane on Saturday Mahayutti office bearers defaced Ghodbunder with placards
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी घोडबंदर विद्रुप, मोदी हेलेकाॅप्टरने येणार तरीही अतिउत्साही पदाधिकाऱ्यांची घोडबंदरभर फलकबाजी
ratan tata dinner with workers
जेव्हा रतन टाटा पिंपरीतील कामगारांसोबत जेवण करतात…ताटही स्वतः…
NCP Sharad Pawar group leader Jitendra Awad allegation regarding the project contractor thane
प्रकल्प कंत्राटदार आधीच ठरतो मग, कंत्राट काढले जाते; राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Bhosari MIDC Garbage piles
भोसरी एमआयडीसीत कचऱ्याचे साम्राज्य
Shambhuraj Desai, Uddhav Thackeray,
चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे उद्धव ठाकरे दबावाखाली, मंत्री शंभूराज देसाई यांचा टोला
Narendra Modi statement that the people of Kashmir are waiting for a terror free government print politics news
काश्मिरी जनतेला दहशतवादमुक्त सरकारची प्रतीक्षा – मोदी
yuvasena s dipesh mhatre
कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी
aimim tiranga yatra marathi news
‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद

हेही वाचा : कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील ४० गावांवर दावा; सुधीर मुनगंटीवार म्हणाले…

“श्रेय आम्हाला देऊ नका पण…”

“सरकार निगरघठ्ठ झालं आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली, तर श्रेय आम्हाला मिळेल म्हणून सरकार जाणीवपूर्वक चर्चेला बोलवत नाही. श्रेय आम्हाला देऊ नका पण सोयाबीनला साडेआठ हजार रुपये आणि कापसाला १२ हजार रुपये भाव द्या. रब्बीचा हंगाम सुरु असल्याने दिवसाची वीज द्यावी,” अशी मागणी तुपकर यांनी केली.

हेही वाचा : “…तर तोंडाची थुंकी का उडवत होता”, दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबो

“..मग तरी सरकारला जाग येईल”

“सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही. पोलिसांनी कितीही दबाव टाकला तरी सरकारशी दोन हात करण्यासाठी तयार आहे. सोयाबीन आणि कापसाला भाव नाही दिला तर, मंत्रालयाच्या खिडकीतून अरबी समुद्रात प्रेतं पडलेली सरकारला दिसतील. मग तरी सरकारला जाग येईल. सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे. सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय सोयाबीन कापूस उत्पादक थांबणार नाही,” असा इशाराही रविकांत तुपकर यांनी शिंदे सरकारला दिला आहे.